अमळनेर-लोक न्यूज
यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम 2021-22 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतातील व्यक्तिगत पिकपेरा लावणे कामी ई -पिकपेरा प्रणाली सुरु करण्यात आली आहे.मात्र बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाही , तर असूनही ते अॅप वापरता येत नाही.यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापासुन कोणताही शेतकरी बांधव वंचित राहता कामा नये. या आशयाचे निवेदन आज.ता.२३ रोजी मारवडसह परिसरातील शेतकरी बांधवांनी तहसीलदार मिलिंद वाघ,प्रांताधिकारी सीमा अहिरे ,तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शेतकऱ्यांनी स्वता शेतातील व्यक्तिगत पिकपेरा लावणे कामी ई -पिकपेरा प्रणाली सुरु करण्यात आली आहे.मात्र बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाही , तर असूनही ते अॅप वापरता येत नाही. यातच ज्याना स्मार्ट फोन वापरता येत असूनही शेतात दिवसभर थांबुनही ई पिकपेरा अॅप हे सदोष बिघाड असल्याने त्यात पिकपेरा लावता येत नाही. अशा सदोष प्रणालीमुळे हे कार्यक्रम कदाचित दीर्घकाळ चालू शकतो? यामुळे यांच्या सदोष प्रणालीमुळे यावर्षी तालुक्यात सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिति असताना वेळ मारून नेन्याचा हा प्रकार होऊ नये. दुष्काळी अनुदान,पिकविमा हा शेतकरी बाँधवाना तात्काळ मिळावा यासाठी आज तहसीलदार मिलिंद वाघ,प्रांताधिकारी सीमा अहिरे,कृषी अधिकारी भरत वारे यांना निवेदन देण्यात आले.
११-१
जूनी पिकपेरा पद्धत सुरु करावी ;दुष्काळी मदत तात्काळ दया-------- ई पिकपेरा प्रणाली अॅप विकसित करण्यात आली असली तरी ती पूर्णता सदोष आहे.यातच प्रत्येक शेतकरी बांधवाला येईलच असे नाही.यामुळे जुनाच पिकपेरा पद्धत लावण्यात यावी.यामुळे सर्वसामान्य शेतकर्याची होरपळ होणार नाही. तर अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम हाताबाहेर गेल्याने दुष्काळी अनुदान ,पिकविमा तात्काळ द्यावा असेही यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी मारवड सह परिसरातील शेतकरी यात दिलीप पाटील , जयवंतराव पाटील,
उमेश सुर्वे ,पंकज पाटील,पांडुरंग पाटील, मधुकर पाटील,दगड़ू पाटील,प्रकाश पाटील, श्यामकांत पाटील,सचिन शिंदे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.