लोक न्यूज
अमळनेर : स्वातंत्र्यानंतर देशात जातीपातीवर आधारित राजकारण सुरू झाले. सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी केली होती. आज आरक्षणाच्या मुद्यावरून समाजांमध्ये दुरावा वाढत आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटील यांचे महत्त्वाचे योगदान आहे, असा दावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी केला.मराठा समाजातर्फे आयोजित समाजभूषण पुरस्कार वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि भोजन कक्षाचे भूमिपूजन अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अनिल पाटील होते.
या वेळी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले, "समाजातील चांगल्या कार्यांची दखल घेणे, गुणवंतांना सन्मान देणे ही प्रेरणादायक बाब आहे. समाजातील प्रत्येकाने एक दिवस समाजासाठी दिला पाहिजे." त्यांनी अमळनेर तालुक्यातील मराठा तरुणांना आर्थिक महामंडळामार्फत उद्योगासाठी सहाय्य मिळावे, अशी मागणी आमदार नरेंद्र पाटील यांच्याकडे केली.
कार्यक्रमात आ. नरेंद्र पाटील, आ. अमोल पाटील (पारोळा-एरंडोल), ढेकू बु. चे उपसरपंच गुणवंत नथु सोनवणे, अमळगावचे सरपंच गिरीश पाटील, DYSP विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, RTO मयूर निकम, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, सभापती अशोक पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयवंतराव पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव विक्रांत पाटील, कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे, प्रविण पाटील, राजेंद्र देशमुख, एस.एम. पाटील, मनोहर पाटील, स्वप्नील पाटील, जे.पी. पाटील, डॉ. सुमित पाटील, गौरव पाटील, भूषण भदाणे, सुलोचना वाघ, पद्मजा पाटील यांचे योगदान लाभले.
यावेळी दिलेल्या देणग्या पुढीलप्रमाणे:
• नथु गुणवंत सोनवणे – ₹1,00,000
• गिरीश पाटील – ₹51,000
• हरीश देधमुख – ₹11,000
• हेमंत पाटील – ₹11,000
कार्यक्रमात सभापती अशोक पाटील, विक्रांत पाटील, महेंद्र बोरसे यांचाही सन्मान करण्यात आला.