वाशी(मुंबई)-लोक न्यूज

२२ डिसेंबर २०२० रोजी घडलेला एक दुर्दैवी प्रकारामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या नवी मुंबईतील असंख्य महिला किती सुरक्षित आहेत, असा सवाल ट्रस्टच्या राष्ट्रीय अध्यक्षा शितल शिवाजीराव मोरे यांनी पत्राद्वारे विचारला होता. त्या प्रकरणाचा पूर्ण छडा लावला आणि भविष्यात अशी कोणतीही अप्रिय घटना घडू नये या साठी काही उपाय योजना केल्यात ते पाहण्यासाठी आणि सगळ्या शंकांचे निरसन करण्यासाठी वाशी रेल्वे पोलिसांकडून बोलावणं आल होते. ट्रस्ट च्या अध्यक्षा शितल जी आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिकेत आवटे पोलिसाना भेटीस गेली असता, सदर मुलीचे जवाब व त्यावर केली गेलेली कार्यवाही सविस्तर दस्तऐवज दाखवण्यात आले आणि उपस्थित शंकांचे निरसन करण्यात आले.
नवी मुंबईतील कामानिमित घराबाहेर पडतात, सोयीचा प्रवास करण्यासाठी लोकल रेल्वेने प्रवास करतात. वाशी रेल्वे पोलिसांनी केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना, सकाळी व संध्याकाळी गर्दीच्यावेळी व्हीजीबल पोलीसिंग करणे, जास्तीत जास्त पोलिस अंमलदार यांना गणवेशा मध्ये फलाटावर महिलांच्या डब्यासामोर उपस्थित असणे,गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिस अंमलदार यांचेकरवी फलाटावर साध्या वेशात सपळयांचे आयोजन करण्यात येते. तसेच रात्री ०८.०० ते सकाळी ०६.०० वाजे पर्यंत पोलिस अंमलदार एम्एसएफ, होमगार्ड यांना महिलांचे डब्यात लोकल पेट्रोलिंगकामी नेमण्यात येते याबाबतीत माहिती दिली.
पो. उप. निरी. श्री. ए. सी. आढाव, प्रमुख रायटर श्री. देवेंद्र पाटील आणि सौ. म्हात्रे यांनी केलेल्या सहकार्य आणि सकारात्मक प्रतिसाद या साठी आभार मानले, तसेच समाधान व्यक्त करून ट्रस्टच्या अध्यक्षा शितल शिवाजीराव मोरे यांनी आपला जवाब सुद्धा नोंदवला.
महिला सुरक्षा हा खूप संवेदनशील विषय आहे, अजून कोणाला काही मदत हवी असल्यास सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया सोबत संपर्क करू शकता, आपण योग्य ती मदत करण्यास नेहमीच तत्पर असू.