लोकन्यूज विशेष: भारतात लॉकडाउन चे भक्कम मुख्य वकील म्हणून देशाचे प्रधानमंत्री हे वकील तर त्यांचे सहकारी वकील म्हणून सर्व राज्याचे मुख्यमंत्री आपली भूमिका पार पाडत असून लॉक डाउन चे नियम मोडल्यास निसर्ग जज बनून कोरोनारुपी शिक्षा देत आहे.
भारतात 3 मे पर्यंत आवश्यक असे लॉकडाउन असून ते का आवश्यक आहे याचे महत्व जणू निसर्गरूपी जज साहेबांना मोदी यांनी पटवून दिले आहे. आणि देशात कोणी नागरिकांनी लॉकडाउन चा नियम मोडल्यास त्याला कोरोना आजाराची शिक्षा मिळत आहे. म्हणून मोदी व सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांची टीम कोणी लॉक डाउन चे नियम मोडू नये म्हणून डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत. कारण निसर्गरूपी जज साहेबांनी कोरोना ची शिक्षा ठोठावल्यास त्याचे परिणाम सर्व समाज घटका वर होईल यात शंकाच नाही..
म्हणून "लोक न्युज"सर्वांना"लॉक डाउन"पाळण्याचे आवाहन करीत आहे.