अमळनेर:अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पीक विमा कंपनीने पीक विमा रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी शिरूड गावाचे विविध कार्यकारी सोसा.चे चेअरमन तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस प्रा. सुभाष सुकलाल पाटील व अमळनेर तालुल्याचे काँग्रेस अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी केली आहे.
अमळनेर तालुक्यात एकूण 28000 कापूस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी अग्रीकलचर इन्शुरन्स इंडिया लि.,या कंपनिकडुन पीक विमा काढलेला आहे मात्र अमळनेर तालुक्यातील एकून 50 गावात अतिवृष्टी व 86 गावात अवकाळी पावसामुळे शेतकरी यांचे नुकसान झालेले आहे म्हणून त्यांना पीक विमा रक्कम मिळावी अशी राज्य सरकारकडे मागणी काँग्रेस चे प्रा. सुभाष् पाटील व गोकुळ पाटील यानी केली आहे.