अमळनेर(प्रतिनिधी ) अमळनेर व पारोळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून या दोन्ही तालुक्यात 50 पैशाच्या आत आणेवारी लावावी अशी मागणी आ शिरीष चौधरी यांनी महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी पत्रन्वये केली आहे
सदर पत्रात आ चौधरी यांनी म्हटले आहे की या वर्षी जून व जुलै अखेर पावसाचे प्रमाण 50 टक्केपेक्षा कमी झाले असून अमळनेर तालुक्यात 27 टक्के तसेच पारोळा तालुक्यात 50 टक्के पेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे पिकांची वाढ व उत्पादन क्षमता कमी होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे.तरी अमळनेर व पारोळा तालुक्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पाहता शासन निर्णय दि 3 नोव्हेंबर 2015 च्या निकषानुसार तालुक्यात 50 टक्केपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे यामुळे अमळनेर व पारोळा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून तालुक्याची आणेवारी 50 पैश्याच्या आत जाहीर करावी अशी विनंती.आ चौधरी यांनी या पत्रात केली आहे,तसेच या संदर्भात दोन्ही तालुक्याच्या विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून तसा अहवाल आ चौधरी हे शासन दरबारी सादर करणार आहेत कोणत्याही परिस्थितीत हे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर होऊन शेतकऱ्यांना शासनाचा आधार मिळावा हा त्यांचा प्रयत्न आहे