लोक न्यूज
अमळनेर-निम्न तापी पाडळसरे धरणासाठी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांची भेट ठरली असल्याने अमळनेर मतदारसंघात अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देऊ शकलो नाही परंतु असे असले तरी शासन व प्रशासन या दोघांच्या मी संपर्कात असून
पीडित शेतकरी बांधवाना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले की अमळनेर मतदारसंघात पातोंडा,नांद्री,अमळगाव व खेडी तसेच पारोळा तालुक्यातील शेळावे परिसरातील गावात अतिवृष्टी झाल्याने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले याशिवाय नांद्री, पातोंडा व अमळगाव परिसरात पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेकांची घरे उध्वस्त झालीत.याबाबत माहिती मिळाल्यानंतर लागलीच मी प्रांताधिकारी तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, कृषी अधिकारी यांना मदत कार्याच्या सूचना केल्या,माजी जि प सदस्य सौ जयश्री पाटील यांनी संपूर्ण पाहणी केली तसेच शासनाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांना देखील याची कल्पना मी दिली आहे.पंचनाम्याचे आदेश ही दिले असून लवकर पंचनामे झाल्यावर शासनाकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न राहतील.शेतकरी बांधवावर आज संकट आले असले तरी सामूहिकपणे आपण त्यास सामोरे जाऊ,शेतकरी बांधवानी काळजी करू नये मी पूर्णपणे त्यांच्या सोबत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
अमळनेर-निम्न तापी पाडळसरे धरणासाठी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांची भेट ठरली असल्याने अमळनेर मतदारसंघात अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देऊ शकलो नाही परंतु असे असले तरी शासन व प्रशासन या दोघांच्या मी संपर्कात असून
पीडित शेतकरी बांधवाना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले की अमळनेर मतदारसंघात पातोंडा,नांद्री,अमळगाव व खेडी तसेच पारोळा तालुक्यातील शेळावे परिसरातील गावात अतिवृष्टी झाल्याने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले याशिवाय नांद्री, पातोंडा व अमळगाव परिसरात पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेकांची घरे उध्वस्त झालीत.याबाबत माहिती मिळाल्यानंतर लागलीच मी प्रांताधिकारी तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, कृषी अधिकारी यांना मदत कार्याच्या सूचना केल्या,माजी जि प सदस्य सौ जयश्री पाटील यांनी संपूर्ण पाहणी केली तसेच शासनाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांना देखील याची कल्पना मी दिली आहे.पंचनाम्याचे आदेश ही दिले असून लवकर पंचनामे झाल्यावर शासनाकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न राहतील.शेतकरी बांधवावर आज संकट आले असले तरी सामूहिकपणे आपण त्यास सामोरे जाऊ,शेतकरी बांधवानी काळजी करू नये मी पूर्णपणे त्यांच्या सोबत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.