अमळनेर : धर्म आणि जात न पाहता पाण्यात बुडणाऱ्या मित्राला वाचवणाऱ्या अमळनेरच्या इन्साफ खानचा गाळात बुडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २० रोजी धुळे येथील एम आय डी सी तलावात घडली. मित्राला जीवदान देणाऱ्या इन्साफ ला मात्र नियतीने इन्साफ दिला नाही*
मूळचा राजस्थान येथील आझाद खान हे कामानिमित्त मुंदडा बिल्डर्स यांच्याकडे जेसीबी चालक म्हणून काम करीत होते. अमळनेर येथे भाड्याने राहत होते. त्यांचा मुलगा इन्साफ हा धुळ्याला एस व्ही के एम महाविद्यालयात बी फार्मसी च्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्यांची विवाहनिश्चित झाला होता. १९ रोजी इन्साफ हा त्याचा मित्र मयूर गांगुर्डे यांच्यासोबत धुळे अवधान एम आय डी सी तलावाकडे फिरायला गेले होते. तलावाकाठी अचानक फिरताना मयूर चा पाय सटकला आणि मयूर बुडू लागला. क्षणाचाही विलंब न करता इन्साफ ने पाण्यात उडी मारली. प्रयत्नाने त्याने मयुरला बाहेर काढले मयुरचे प्राण वाचले मात्र इन्साफ गाळात अडकला बाहेर येण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू झाला. तो गाळात बुडाला. तेव्हढ्यात जवळच असलेल्या कोळी बांधवांनी उडी मारली आणि इन्साफला बाहेर काढले. त्याच्या नाकातोंडात गाळ गेल्याने त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय हिरे महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयात पाठवले. इन्साफला सिद्धेश्वर हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले. तातडीने उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही २० रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास इन्साफची प्राण ज्योत मालवली.
हिंदू मुस्लिम मैत्रीला जागून इन्साफने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या मित्राला मयुरला वाचवले पण निसर्गाने त्याला इन्साफ दिला नाही म्हणून सर्वांनी हळहळ व्यक्त केली. घटनेचे वृत्त कळताच अमेय मुंदडा घटनास्थळी धावले. धुळे मोहाडी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील हे देखील मदतीला धावले. शवविच्छेदन करून शवं ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी शव राजस्थानकडे रवाना करण्यात आले.
मूळचा राजस्थान येथील आझाद खान हे कामानिमित्त मुंदडा बिल्डर्स यांच्याकडे जेसीबी चालक म्हणून काम करीत होते. अमळनेर येथे भाड्याने राहत होते. त्यांचा मुलगा इन्साफ हा धुळ्याला एस व्ही के एम महाविद्यालयात बी फार्मसी च्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्यांची विवाहनिश्चित झाला होता. १९ रोजी इन्साफ हा त्याचा मित्र मयूर गांगुर्डे यांच्यासोबत धुळे अवधान एम आय डी सी तलावाकडे फिरायला गेले होते. तलावाकाठी अचानक फिरताना मयूर चा पाय सटकला आणि मयूर बुडू लागला. क्षणाचाही विलंब न करता इन्साफ ने पाण्यात उडी मारली. प्रयत्नाने त्याने मयुरला बाहेर काढले मयुरचे प्राण वाचले मात्र इन्साफ गाळात अडकला बाहेर येण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू झाला. तो गाळात बुडाला. तेव्हढ्यात जवळच असलेल्या कोळी बांधवांनी उडी मारली आणि इन्साफला बाहेर काढले. त्याच्या नाकातोंडात गाळ गेल्याने त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय हिरे महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयात पाठवले. इन्साफला सिद्धेश्वर हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले. तातडीने उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही २० रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास इन्साफची प्राण ज्योत मालवली.
हिंदू मुस्लिम मैत्रीला जागून इन्साफने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या मित्राला मयुरला वाचवले पण निसर्गाने त्याला इन्साफ दिला नाही म्हणून सर्वांनी हळहळ व्यक्त केली. घटनेचे वृत्त कळताच अमेय मुंदडा घटनास्थळी धावले. धुळे मोहाडी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील हे देखील मदतीला धावले. शवविच्छेदन करून शवं ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी शव राजस्थानकडे रवाना करण्यात आले.