लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यात खान्देश रक्षक संघटनेतर्फे ३० जानेवारी हुतात्मा दिनानिमित्त शहिद सैनिकांना अभिवादन करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये देशभक्ती ,राष्ट्रभक्तीचा जागर निर्माण व्हावा म्हणून मशाल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. सानेगुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ५०० फुटाचा तिरंगा धरला होता. एका जीप वर हुतात्मा स्मारक उभारण्यात आले होते. माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाबाहेरील पुतळ्याचे पूजन करण्यात आले. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते स्मारकाचे पूजन झाले त्यांनतर मशाल पेटवून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीचे आयोजन खान्देश रक्षक संस्थेचे संयोजक विवेक पाटील , तालुकाध्यक्ष विजय सुर्यवंशी ,उपाध्यक्ष विलास महाले , धनराज पाटील , हर्षल पाटील , महेंद्र बागुल , शरद पाटील ,राजेंद्र यादव व आजी माजी सैनिकांनी केले होते. रॅलीत खान्देशातील आजी माजी सैनिक माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी , संजय पाटील ,हेमकांत पाटील , मनोज शिंगाणे, आशिष पाटील , गुरव सहभागी झाले होते. नाट्यगृहापासून ,सुभाष चौक , तिरंगा चौक या मार्गे रॅली काढून सानेगुरुजी शाळेत विसर्जन करण्यात आले.