लोक न्यूज-
उद्याच्या बंदमध्ये सहभागी होऊन तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून द्या, प्रहार जनशक्ती पक्ष बंदच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष युवा तालुका अध्यक्ष रविंद्र भगवान पाटील यांनी जाहीर आवाहन केले आहे.
उद्याच्या बंद मध्ये सहभागी होऊन अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून द्या
प्रहार जनशक्ती पक्ष 
 बंदच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष युवा तालुका अध्यक्ष रविंद्र भगवान पाटील यांचे जाहीर आवाहन
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनात नरसंहार करणारे आधुनिक जनरल डायर तथा शेतकऱ्यांचे मारेकरी योगी तथा भाजपा सरकारच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्ष अमळनेर तालुका उद्या सोमवार दि. 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असल्याने या बंद मध्ये सर्वांनी
मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून द्यावे असे जाहीर आवाहन अमळनेर प्रहार जनशक्ती पक्ष युवा तालुका अध्यक्ष रविंद्र भगवान पाटील यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तर्फे केले आहे.
यासंदर्भात रविंद्र पाटील यांनी आवाहन करताना म्हटले आहे की लखीमपूर घटनेवरून राज्यातील व अमळनेर तालुक्यातील जनतेच्या भावना तीव्र असून यामुळे सोमवार च्या बंदमध्ये येथील जनता निश्चिंतपणे सहभागी होईल, व इतर घटक पक्ष संपूर्ण ताकदीने बंद मध्ये उतरणार आहेत,लखीमपूर मध्ये ही संविधानाचीच हत्या झाली असून अन्नदाता शेतकऱ्यांना संपविण्याचे हे शडयंत्र आहे,त्यामुळे तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि येथील जनता शेतकरी पाठिशीच आहे हे आम्ही उद्या कळकळीत बंद पाळून दाखवून देऊ असा दावा रविंद्र पाटील यांनी केला आहे.तर व्यापारी बांधवांसह जनतेने शेतकऱ्यांसाठी स्वयंस्फूर्तीने उद्याच्या बंद मध्ये सहभागी व्हावे अशी विनंतीही प्रहार जनशक्ती पक्ष अमळनेर तालुका यांनी केली आहे.