अमळनेर : राज्यातील शेतकऱ्यांचा 50 टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडलेला असल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते त्यामुळे 20 -  21 एप्रिल पासून कापूस खरेदी सुरू  करण्याचा निर्णय घेतल्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले आमच्या मागणीला होकार मंत्र्यांनी दिल्याने लॉक डाऊन मध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले 
          कोरोना मुले लॉक डाऊन झाल्याने 50 टक्के शेतकऱ्यांचा कापूस सी सी आय खरेदी बंद झाल्याने त्यांच्या घरातच अडकून पडला होता शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता , पुढच्या हंगामाची तयारी करण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते म्हणून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी आमदार अनिलदादा यांच्याकडे केली होती अनिल दादा यांनी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रातून आमदारांनी पणन मंत्र्यांना कापूस खरेदी करण्याचा आग्रह धरला होता पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भ्रमणध्वनिवरून आमदार अनिल पाटील यांना कळवले की 20-  21 पासून कापूस खरेदी प्रक्रिया सुरू करीत आहोत त्यानुसार आमदार अनिल पाटील यांनी नागपूरचे प्रशासकीय अधिकारी महाजन  यांच्याशी चर्चा करून ज्या जिनिंग प्रेसिंग चे करार संपले असतील ते वाढवून , हमाल मापाडी यांचीही उपलब्धता करून कापूस खरेदीची तयारी करावी अशा सूचना दिल्या आणि उद्या 19 पासून कापूस पनन मंडळाचे झोनल अधिकारी , जिल्हाधिकारी , जिल्हा उप निबंधक यांची एकत्र बैठक आयोजित करण्यात आली असून त्याच्यावर एकत्रित खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येईल त्यामुळे जळगाव जिल्हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी निश्चिन्त राहावे प्रत्येक शेतकऱ्यांचा कापूस विकत घेतला जाईल असे सांगून आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आणि पणन मंत्री सह आघाडी सरकारचे आभार मानले आहेत