अमळनेर: केंद्र सरकारने केलेल्या लॉकडाऊन मुळे जेरीस आलेला सामान्यजन जेरीस आला असून गावाची व आपल्याची ओढ कित्येक मैल पायी चालण्यास काही लोकांना मजबूर करत आहे.असाच एक प्रकार अमळनेर तालुक्यात उघड झाला पण प्रशासनाने वेळीच त्या व्यक्तीला क्वॉरोनटाइन केले आहे.
सुरत येथे हातमजुरी करणारा रमेश बाबुराव पाटील(वय 42) यास लॉकडाउन मुळे खाण्याची परवड होऊ लागली त्यामुळे अमळनेर तालुक्यातील झाडी या मूळ गावी जाण्यास ते पायी पायी निघाले व 4 दिवसात ते झाडी या गावी पोहचले पण ग्रामसेवक व प्रशासनाने त्यांना गावातील शाळेत क्वॉरोनटाइन केले.
कोरोना विरुद्ध खबरदारी म्हणून त्यांना गावात प्रवेश करु न देता त्यांना गावातील शाळेत क्वॉरॉनटाइन केले गेले आहे असे लोक न्युज शी बोलताना ग्रामसेवक यांनी सांगितले आहे.