प्रतिनिधी अमळनेर
अवकाळी पावसाचे थैमान सुरु झाले असून तालुक्यात तुरळक गारपीट वादळी वारा झाल्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील उरली सुरली पिके पूर्णत: नष्ट होऊन बळीराजा पुरता ‘गार’ झाला आहे.
बुधवारी आमदार अनिल पाटील आमदार स्मिता वाघ व तहसीलदार मिलिंद वाघ व कृषी अधिकारी भरत वारे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या गांवात जाऊन पिकांच्या नुकसान झालेल्या शेतशिवारातील नुकसानीची पाहणी करत आमदार पाटील व आमदार वाघ यांनी पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
यात मंगरूळ, चिमणपुरी, पिंपळे, लोंढवे जवखेडा, अंचलवाडी आर्डी, आनोरे, वाघोदा, निसर्डी येथे अवकाळी पाऊस, बारीक गारपीट ग्रस्त भागात नुकसानीने रब्बी पिकांना फटका बसला आहे. त्यात तोंडाजवळ आलेले पीक जमीनदोस्त झाले असून शेकडो हेक्टर रब्बी गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी, कांदा, शेवगा, भाजीपाला, फळबागा मका, पिकांचे अतोनात नुकसान झाले यामुळे शेतकरी हताश झाला. एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता झालेल्या या वादळी पाऊस आणि गारपिटीने सायंकाळी पावसाला सुरूवात झाली.त्यानंतर काही वेळात जोरदार गारपीटीला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली होती.वादळामुळे काही घरांचे छत उडाले तर तब्बल पाऊस तास जोरदार पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. तर ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील पातोंडा भागात देखील वादळी पाऊस झाला. असून त्या भागात देखील पाहणी करण्यासाठी अधिकारी वर्ग जाणार असून त्यानंतर प्राथमिक अहवाल मिळणार आहे.
मंगरूळ मंडळ,शिरूड मंडळ,वावडे, नगाव मंडळात नुकसान झाले आहे. कृषी कार्यालयामार्फत तहसील विभागाला दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार बाधित गावे आणि शेतकरी संख्या व गावे
शेतकरी संख्या - 4593
बाधित गावे - 43
बाधित क्षेत्र - 3562.91हेक्टर