मुंबई प्रतिनिधी दि.23/04/2020
महाराष्ट्रात करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातील आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी यांच्याबरोबरच प्रसारमाध्यमातील गावपातळीपर्यंतचे पत्रकार बांधव, जीव धोक्यात घालून योगदान देत आहेत. मात्र मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला. बातमीचे वार्तांकन करण्याचे काम करणारे "पत्रकारच बातमी" झाले आहेत. तुटपुंजा पगार आणि मानधनावर राष्ट्रीय "कर्तव्य" म्हणून पत्रकार काम करत असले तरी सरकारकडून कोणतेच आर्थीक संरक्षण नाही. विहीत नियमावलीत मिळणारी अधिस्वीकृती पत्रीका आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी मधुन अकस्मीत मृत्यूनंतर एक लाख रूपये कुटुंबीयाना मदत यापेक्षा काही मिळत नाही.आष्युभर समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या अनेक पत्रकारांना वृद्धपकाळात, आर्थिक विवंचनेत हालाकिचे जीवन जगावे लागले.तर आजार पण,आल्यां नंतर उपाचाराला पैसे नसल्याने त्रास सहन करण्याची वेळ ओढावी गेल्याचेही अनेक प्रकार घडले. पत्रकाराला कुटुंबीक जबाबदारीमुळे,त्यांचेही काही प्रश्न असतात याचा विचार सरकार दरबारी अनेकदा मागण्या करूनही होत नाही. राजकीय नेत्यांपासून प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि सामान्य जनतेलाही, सत्ताधारी व्यवस्थेला जाब विचारणारा पत्रकार हवा असतो. मात्र हाच पत्रकार अडचणीत सापडतो तेव्हा कोणीच मदतीचा हात देत नाही, असे अनेक वेळा दिसून आले आहे.मुबंईत करोना ची बाधा झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांनवर ओढवलेल्या संकटाची कल्पना केली तरी मन हेलावून जाते.त्यामुळे करोनाच्या लढ्यात वार्तांकन करताना पत्रकारांनी आपली काळजी घेतली पाहिजे हेच, या घटनेने स्पष्ट झाले आहे. करोना विषाणू पत्रकारांना सवलत देत नाही.म्हणून सरकारच्या सुचनांचे पालन करून सामाजिक अंतर राखून स्व:हाला सुरक्षित ठेवावेच लागेल. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने राज्यभर स्थानिक पातळीवर पदाधिकारी गरजूंना लोकसहभागातून मास्क, सॅनिटायझ, खाद्य पाकिटे, किरण, मदतीचे वाटप, सर्व जिल्ह्यात, शहरात संघटनेचे पदाधिकारी, सदस्यांनी लोकसहभागातून "मदत यज्ञ" चालवला ते कर्तव्य भावनेतून, याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य आणि सर्व पत्रकारांनी मदतीने तिचे वाटप करताना, वार्तांकन करताना, आपले आरोग्य धोक्यात येणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्यावी. एखादी माहिती,वेळेत नाही मिळाली तरी संयम बाळगावा.घरात राहुनच काम करण्याचा प्रयत्न करावा. आपला निष्काळजीपणा कुटुंबाला अडचणीत आणणारा ठरू नये. बातमीच्या पलीकडे आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे याचे भान ठेवूनच काम करावे,अशी कळकळीची विनंती सर्व पत्रकार सहकारी बांधवांना केली
आहे .