मुंबई आणि पुण्यात कायम राहील दारावर वितरण बंदीचा आदेश

नितीन जाधव मुंबई मंञालय प्रतिनिधी

:महाराष्ट्र सरकारने दैनिकाचे घरोघरी वितरणासंबंधी निर्बंध घातल्याचे वृत्त समजताच वृत्तपञसृष्टीतील सर्व घटकासह संपादक ,मालक,पञकार यांचेकडून तीव्र संताप व्यक्त झाला होता. यामुळेच तातडीने महाराष्ट्र राज्य पञकार संघाने सीएमओ ,मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना निर्बंध हटवण्यासंदर्भात पञव्यवहार केला होता. आज मंगळवारी सरकार ने हे निर्बंध शिथील करत बदल केला आहे. 
त्यानुसार, हे निर्बंध आता केवळ मुंबई महानगर आणि पुण्याच्या हद्दीपर्यंत मर्यादित राहणार आहे. हे दोन्ही ठिकाण महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचे हॉट स्पॉट ठरलेले आहेत. तत्पूर्वी राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 18 एप्रिल रोजी एक आदेश काढले होते. त्यानुसार, दैनिक आणि मासीके यांच्या छापाईला मंजुरी दिली होती परंतु, घरो-घरी होणाऱ्या वितरवणावर बंदी लावली होती. 20 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार असे सांगण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ नेहमीच पञकारांचे प्रश्न सोडवत असतो त्याचाच एक भाग म्हणून महा.राज्य पञकार संघाने वृत्तपञाचे घरोघरी वितरण निर्बंध काढून टाकणे संदर्भात मुख्यमंत्री व राज्यपाल यांना तातडीचे पञ पाठवले होते त्यामुळे अखेर सरकारला हे नियम बदलावे लागले आहेत.

सरकारने दैनिक आणि मासीकांना दिलासा दिला तरीही वितरणासाठी काही दिशा-निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, ज्या-ज्या ठिकाणी घरो-घरी दैनिक किंवा मासीक टाकले जाणार आहेत, तेथे ते घेणाऱ्याला याची माहिती असायला हवी. तसेच वृत्तपञ घरोघरी टाकणाऱ्या विक्रेत्यास तोंडावर मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर करतानाच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. सरकारने वृत्तपत्र आणि मासीकाना दिलेली ही सूट महाराष्ट्रभर लागू होत असली तरीही पुणे आणि मुंबई उपनगरांना यातून वगळण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यासाठी मागील आदेश आणि वितरणासंबंधित निर्बंध कायम राहतील असेही या आदेशात सांगण्यात आले आहे. दरम्यान हीच बंदी कंटेनमेंट झोन असलेल्या भागांमध्ये सुद्धा पाळावी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य पञकार संघ नेहमीच पञकारांच्या सामान्यांच्या न्यायीक विषयावर सरकार दरबारी आवाज उठवत असतो . महाराष्ट्र राज्य पञकार संघाच्या पाठपुराव्याची ,पञाची सरकारकडून तात्काळ दखल घेतली गेली असल्यामुळे संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश संघटक संजयजी भोकरे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,प्रदेश कार्यध्यक्ष राकेश टोळ्ये,किरण जोशी,ग्रा.प्रदेशाध्यक्ष मनिष केत ,प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांनी 
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे आभार मानले आहेत.