लोक न्यूज
अमळनेर : शहरातील ओम साई श्रद्धा नगर मधून एक चार चाकी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना २४ रोजी रात्री घडली.प्रवीण हरिश्चंद्र ठाकूर यांनी फिर्याद दिली की त्यांचे मेव्हणे मनीष राजाराम पवार यांची सुमारे दीड लाख रुपये किमतीची चार चाकी क्रमांक एम एच १८ , ए जे ३११० हिच्यावर त्यांच्या परिवाराला अमळनेर घेऊन आले. त्यांचे मेहुणे कामानिमित्त दिल्ली गेल्याने चार चाकी अमळनेर येथे प्रवीण ठाकूर यांच्या घरासमोर लावली होती. पहाटे पाच वाजता ते लघु शंकेला उठले असता त्यांना चार चाकी दिसून आली नाही. याबाबत त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार ,विनोद संदानशीव , उज्वल म्हस्के , प्रशांत पाटील , जितेंद्र निकुंभे ,निलेश मोरे ,रवी पाटील ,अमोल पाटील तसेच एलसीबी पथक प्रवीण मांडोळे,संदीप पाटील,राहुल कोळी यांची पथके चोराचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
त्याचप्रमाणे टाकरखेडा येथून देखील मनोहर विश्वास पाटील यांची एम एच १९ ई क्यू ८७४६ ही ४० हजार रुपये किमतीची दुचाकी घराबाहेर लावली होती. पहाटे ३ वाजता ते लघुशंका करण्यास गेले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.